'कोरोनामुळं तरुणांची संधी हुकली; आता सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत सवलत द्या'

Age Limit for Indian Army Recruitment
Age Limit for Indian Army Recruitmentesakal
Summary

'भरतीअभावी संधी गमावलेल्या युवकांना खास बाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी.'

कऱ्हाड (सातारा) : सैन्य दलात (Indian Army) जाण्यासाठी अनेक तरुणांनी भरतीपूर्व तयारी केली आहे. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून सैन्य भरती (Indian Army Recruitment) प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्याने केंद्र सरकारने (Central Government) सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना दिलासा द्यावा. भरतीअभावी संधी गमावलेल्या युवकांना खास बाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी लोकसभेत केली.

खासदार पाटील यांनी लोकसभेत (Lok Sabha) तातडीचे व लोकहितासाठी महत्त्वाचे मुद्दे सादर करून सभागृहांच्या पटलावर ठेवले. खासदार पाटील म्हणाले, ‘‘कोरोनामुळे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्कर, नौदल (Navy) आणि हवाई दलातील (Air Force) भरती बंद आहे. विशेषत: सातारा जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा असून, ती परंपरा आजतागायत सुरू आहे. सातारा जिल्ह्यातून (Satara District) सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांश युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोन- दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परीक्षेची तयारी करत असतात. सैन्य दलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र, कोरोनाने ओढवलेल्या परिस्थितीमुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत आहे. परिणामी त्यांची आलेली संधी हुकत असून, त्यांचे स्वप्न हिरावून जात आहे.

Age Limit for Indian Army Recruitment
JEE Main परीक्षा ढकलली पुढं; NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर

कोरोनाचा प्रभाव आता कमी झाला आहे. माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha constituency) अशी अनेक गावे आहेत. जिथे प्रत्येक घरातील तरुण देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगतो; परंतु भरती प्रक्रियाच बंद असल्याने त्यांचे हे प्रयत्न धुळीस मिळत आहेत. याशिवाय कोरोनामुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित झाल्याने वयाच्या मर्यादेत आलेल्या इच्छुक तरुणांची संधी हुकली आहे. त्यांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात येत आहे. अशा युवकांचे भविष्य, त्यासाठी ते घेत असलेले परिश्रम व त्यांची संपत चाललेली वयोमर्यादा लक्षात घेता भारत सरकारने (Government of India) खासबाब म्हणून अशा युवकांसाठी भरतीची वयोमर्यादा वाढवावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com