सातारा : सध्या सातारा जिल्ह्याला वळिवाचा (Heavy Rain) मोठ्या प्रमाणात तडाखा बसत असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यातच आता परळी खोऱ्यात (Parli Area) गेल्या आठवडाभरापासून वळिवाने हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा अन् गारांचा भडीमार अशातच परळी ते केळवली रस्त्यावरील आलेले मातीचे लोट यामुळे मकरंद अनासपुरे यांचा मराठी चित्रपट ‘दे धक्का’ प्रमाणे वाहनधारकांना गाळात रुतलेले वाहन हे धक्का मारत बाहेर काढावे लागत आहे. संबंधितांनी तत्काळ रस्त्यावरील गाळ काढून वाहनधारकांची होणारी त्रेधातिरपीठ थांबवावी, अशी मागणी वाहनधारकांसह ग्रामस्थांतून होत आहे. (Heavy Rain In Parli Area Of Satara Rain News)
सातारा जिल्ह्यात वळीव पाऊस गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने बरसत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परळी ते कातवडी हा रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, नाले खुदाई न केल्याने वळिवाने डोंगर उतारावरील मातीचे लोट हे रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना धक्का मारत वाहने गाळामधून बाहेर काढावी लागत आहेत.
परळी ते केळवली हा रस्ता प्रमुख मार्ग असून या मार्गाहून अनेक गावांना ये-जा करण्यास सोईस्कर ठरते. मात्र, वळीव पावसाने आलेले मातीचे लोट यामुळे हा मुख्य रस्ता आहे की गावातील अंतर्गत पांद रस्ता? असा प्रश्नच उभा राहत आहे. मान्सून आधी ग्रामीण भागातील नालेसफाई, तसेच खुदाई ही सुरु झाली पाहिजे. मात्र, संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गाडी गाळात बंद पडली तर तासनतास हे गाडी बाहेर काढण्यासाठी वेळ जात आहे. यामुळे वाहनधारकांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
Heavy Rain In Parli Area Of Satara Rain News
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.