

Uday Samant
sakal
कऱ्हाड - ग्रामीण भागातील साहित्यिकांच्या साहित्याला राज्य, देश पातळीवर व्यासपीठ मिळावे, यासाठी जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महाराष्ट्राच्या स्तरावर मराठी भाषा विभागांतर्गत स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून ग्रामीण, तसेच शहरी साहित्यिकांच्या मराठी साहित्याचे इंग्रजीसह अन्य भाषांमध्ये अनुवाद करण्याची जबाबदारी मराठी भाषा विभाग घेईल अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केली.