शाब्बास...खटाव, इंजबाव ग्रामपंचायतींना आठ लाखांचे पुरस्कार
सातारा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांची घोषणा केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव व इंजबाव ग्रामपंचायतींचा सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यस्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या यादीत स्थान पटकाविले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी आठ लाख रुपयांची पुरस्कार रक्कम मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी शंभर गुणांची प्रश्नावली निश्चित केली आहे. या प्रश्नावलीत स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधन संपतीचे व्यवस्थापन, ई गव्हर्नन्स आदी क्षेत्रात ग्रामपंचायतींनी केलेल्या कामाचे स्वयंमूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर पंचायत समितीकडे पाठविण्यात आली. पंचायत समितीने सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचे नामांकन जिल्हा परिषदेकडे पाठविले. जिल्हा परिषदेने ते ऑनलाइन पद्धतीने शासनास पाठविले होते. त्यानुसार शासनाने आयुक्त स्तरावर नेमलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पथकामार्फत मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतींची तपासणी केली होती. या पथकाने केलेल्या मूल्यांकनानुसार राज्य शासनाने केंद्र शासनास केलेल्या शिफारशीनुसार खटाव तालुक्यातील खटाव, तसेच माण तालुक्यातील इंजबाव ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
खटाव व इंजबाव ग्रामपंचायतींना मिळालेल्या यशामुळे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात, तसेच देशपातळीवर पोचला आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.