Koyna Dam 100 TMC
ESAKAL
कऱ्हाड: मॉन्सुनचा पाऊस यंदा उशीरा दाखल झाल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण यंदाच्या पावसाळ्यात भरणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती. मात्र सातारा जिल्ह्यात 29 जुनपासुन कधी मुसळधार तर कधी मध्यम स्वरुपाच्या झालेल्या पावसाने कोयना धरणाने अखेर आज सोमवारी 100 टीएमसी पाणी साठ्याचा मोठा टप्पा गाठला आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजुनही पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र धरण 100 टीएमसी भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि विज निर्मीतीचा मोठा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे सर्वसस्तरांतील आबालवृध्दांतुन समाधान व्यक्त होत आहे.