

Satara
esakal
कास: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. लोकांना मैलोनमैलाची पायपीट करावी लागत आहे. जलाशयात बुडीत झालेल्या गावठाणातील घरांचे, मंदिरांचे अवशेष उघड्यावर पडले असून, नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी उरले असून, १०५ गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.