
-सचिन शिंदे
कऱ्हाड : तालुक्यातील कृष्णाकाठावरील १९ गावांतील सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. प्रत्येक गावात वेगवेगळी अशी ५२ ठिकाणे आहेत. तेथून ६१ लाख ८३ हजार १५५ लिटर पाणी तयार होते. त्यापैकी कृष्णेच्या पत्रात दररोज २४ लाख दोन हजार ८२८ सांडपाणी मिसळत आहे. त्यातील सुमारे पाच लाख पाच हजार ३७६ लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्याचेही नियोजन पंचायत समितीतर्फे केली जात आहे. कृष्णेत मिसळणारे पाणी तालुक्यातील १९ गावांतील ५६ हजार १९५ लोकवस्ती असलेल्या रहिवाशांकडून मिसळले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.