

सातारा : शेतकऱ्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, जय भवानी... जय शिवाजी, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे... अशी घोषणाबाजी करत जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणारे मोकाट असून, वाढती गुन्हेगारी रोखावी, अशी मागणी केली.