Maharashtra farmer loan waiver controversy
esakal
सातारारोड : निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन देण्यात आले; पण निकालानंतर मात्र ‘योग्य वेळी कर्जमाफी करू,’ असे सांगत सरकार मागे सरकत आहे. स्वतःच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार? हा गंभीर प्रश्न आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde Targets Maharashtra Government) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शासनाला घेरले.