Action by Mahavitaran : दोन हजार थकबाकीदारांची तोडली कनेक्शन : २०.४० कोटींची थकबाकी ; महावितरणकडून कडक कारवाई

Satara News : गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे केले जात आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal
Updated on

- उमेश बांबरे


सातारा : थकबाकीमुळे हैराण झालेल्या महावितरण कंपनीने आता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ३५ दिवसांत तब्बल ५१ हजारांवर थकबाकीदारांची कनेक्शन तोडली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १९२० घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांची कनेक्शन तोडली आहेत. काही ग्राहकांकडून कनेक्शन तोडल्यानंतरही चोरून विजेचा वापर केला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ग्राहकांनी विजेचे बिल वेळेत भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com