सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच जिल्ह्याचा विकास झाला असून, त्यांना मानणारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकवर आहे. आता आगामी निवडणुकीतही आपल्याला हे स्थान कायम ठेवायचे आहे. काही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही स्वबळाची तयारी ठेवावी, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला असून, सर्वांनी यामध्ये झोकून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.