

Marathwadi Dam School Crisis Relocation Still Pending After 29 Years Students Struggle During Monsoon Season
sakal
ढेबेवाडी : प्रतिवर्षी मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या आवारात पोहोचत असले, तरीही मेंढ (ता. पाटण) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या स्थलांतराच्या बाबतीत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने बिकट पेच निर्माण झाला आहे. धरणाचे बांधकाम सुरू झाल्यापासून म्हणजे तब्बल २९ वर्षांपासून याप्रश्नी घोंगडे भिजतच पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.