
दुधेबावी : फलटणसह माळशिरस तालुक्यातून जात असलेल्या नीरा उजवा कालव्यामध्ये दोन ते तीन हजार मृत कोंबड्या टाकल्या असल्याचा प्रकार समोर आला. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे व्हिडिओ व्हायरल करत संताप व्यक्त केला. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या प्रार्थनेवर हा व्हिडिओ स्टेट्सला टाकला आहे.