

सातारारोड : शेतकऱ्यांच्या ताकदीवरच आपला देश, आपले राज्य चालतेय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना देऊन सरकार उपकार करत नाही. राज्याचे कृषिमंत्रीच शेतकऱ्यांच्या संदर्भात अपमानास्पद शब्द वापरत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. सरकारमधील मंत्रीच वाचाळवीर बनले असून, त्यांच्यावर आणि या सरकारवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर आणि संबंधित मंत्र्यांवर टीका केली आहे.