

सातारा : ‘‘छत्रपती शिवराय हे तत्कालीन परिस्थितीतील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी युगपुरुष होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन विचार दिले. आजच्या युगात सुद्धा पालकांनी मुलांचे भवितव्य घडवणारे शिव विचारांचे संस्कार मुलांना द्यावे’’, अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.