दहिवडी - माणच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक आपल्याला पुसायचं आहे. त्यामुळे काळजी करू नका आपल्या बांधापर्यंत कालव्याने पाणी लवकरच पोचवणार असल्याचे आश्वासन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. बिदाल- शेरेवाडी (ता. माण) येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा व सभा मंडप भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मंत्री गोरे बोलत होते.