सातारकरांनाे! कास जलवाहिनीस लागली गळती; पाणी काटकसरीने वापरा

सातारकरांनाे! कास जलवाहिनीस लागली गळती; पाणी काटकसरीने वापरा

सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून कास धरम उदभव योजनेतून पाणी पूरवठा केला जाता. त्या भागातील नागरिकांना कळविण्यात येते की कास माध्यमातील बंदिस्त जलवाहिनीला कासाणी गावाजवळ मुख्य वाहिनीवर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागी आहे.

या गळती काढण्याचे काम सोमवारी (ता.एक मार्च) पालिका युद्धपातळीवर हाती घेणार आहे. हे काम पुर्ण होण्यास साधारणतः आठ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे एक मार्चला सायंकाळी होणारा पाणी पूरवठा आणि मंगळवारी (ता. दोन मार्च) नियमीत केला जाणारा पाणी पूरवठा होऊ शकणार नाही.

तरी कास धरण उदभव योजनेतून ज्या भागात पाणी पूरवठा केला जाता. त्या भागातील सर्व नागरिकांनी पिण्याचा पाण्याचा वापर काटकसरीने करुन पालिकेस सहकार्य करावे. याबाबतचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपूरवठा समितीच्या सभापती सिता हादगे तसेच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.

माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा; उदयनराजेंचा टाेला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com