
कऱ्हाड : लोकशाहीच्या हक्काचे रक्षण केले जात असल्याचा समाजाला विश्वास देण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी आनंदाने काम करताना जनतेच्या दुःखावर फुंकर मारावी. त्यामुळे जनता आपल्यासोबत राहील आणि जनतेला पोलिस आपल्यासोबत असल्याचा विश्वास वाटेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.