घटनेच्या यशाबाबत बाबासाहेबांनी इशारा दिला होताच; दुर्दैवाने 'माेदीं'कडून बळाचा वापर हाेतेय : पृथ्वीराज चव्हाण

घटनेच्या यशाबाबत बाबासाहेबांनी इशारा दिला होताच; दुर्दैवाने 'माेदीं'कडून बळाचा वापर हाेतेय : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : राज्यघटना चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. दुर्दैवाने आज संविधान दिनाच्या दिवशीच पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा घटनादत्त आंदोलनाचा अधिकार मोदी सरकार पोलीस, सैन्याचा वापर करून चिरडून टाकत आहे असे ट्विट करीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माेदी सरकारवर टीका केली आहे.

घटनेच्या निर्मितीसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 आॅगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन झाली. तिने तयार केलेला अंतिम मसुदा 26 नाेव्हेंबरला घटना समितीने स्वीकारला. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येताे.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली 

आज (गुरुवार) देशभरात संविधान दिन साजरा हाेत असताना काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माेदी सरकाराच्या कारभारा विषयी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणतात, राज्यघटना चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. दुर्दैवाने आज संविधान दिनाच्या दिवशीच पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा घटनादत्त आंदोलनाचा अधिकार मोदी सरकार पोलीस, सैन्याचा वापर करून चिरडून टाकत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com