Raju ShettySatara
सातारा
Raju Shetty: साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव मांडावे: राजू शेट्टी; दिवसाला सात शेतकरी जीवन संपवतात..
Karad News : शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असेल, तर सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तसे कायदे करायला हवेत.
कऱ्हाड : अलीकडे साहित्यिकांचे लिखाण हे पुरस्कारासाठी होत आहे. त्यांनी पुरस्कारासाठी लिखाण करताना न करता समाजाच्या हितासाठी करावे. शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी समाजासमोर मांडून त्यावरील उपायही त्यात सांगितले पाहिजेत, तरच ग्रामीण साहित्य अधिक समृद्ध होईल, असे मत माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.

