प्रत्येक बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करा : सभापती रामराजे

प्रत्येक बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करा : सभापती रामराजे

सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. या पंचनाम्यातून एकही बाधित वंचित शेतकरी राहू नये, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. 

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर आढावा आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शेती नुकसानीचे पंचमनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तसा नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या. आपण येत्या आठवड्यात संपूर्ण आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com