भात पीक जोमात, शेतकरी आनंदात; जिल्ह्यात समाधानकारक पाऊस!

भात पीक जोमात, शेतकरी आनंदात; जिल्ह्यात समाधानकारक पाऊस!

मल्हारपेठ (जि. सातारा) : खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळण्याच्या आशा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पाटण तालुक्‍यात भातशेतीला जास्त पोषक वातावरण असल्यामुळे बहुतांशी क्षेत्रात भातशेती पिकवली जाते.

प्रामुख्याने इंद्रायणी, बासुमती, मेनका, भोगावती, पार्वती, आर चोवीस, नाथ सिड्‌स, रासी पूनम, कावेरी 888 आदी वाणाची लागण आणि पेरणी पद्धतीने लागवड केली जाते. या वेळी तरवा पेरणीपूर्व पाऊस समाधानकारक पडल्यामुळे धूळवाप पेरणी आणि तरवांची उगवण चांगल्याप्रकारे झाली. लागणीतही पाऊस समाधानकारक झाल्यामुळे भात पिकास उपयुक्त ठरला असल्यामुळे भातपीक जोमात असल्याचे सर्वत्र दिसत आहे. 

सध्या भातपीक पोटऱ्यात असून, फुलकोष बाहेर पडण्याची स्थिती आहे. ऑक्‍टोबरच्या उत्तरार्धात भातपीक काढणीस येत असल्याने आडव्या पाण्याचाही प्रश्न उद्‌भवणार नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. पाऊस समाधानकारक झाला असल्यामुळे जमिनीत उपळा निर्माण झाला आहे. यामुळे पिकांची अवस्था समाधानकारक दिसत आहे, तर दुसरीकडे अती पाऊस आंतरमशागतीच्या कामाला संधी न मिळाल्यामुळे हायब्रीड, भुईमूग, सोयाबीन पिकाचे उत्पन्न निम्म्यापेक्षा जास्त घटणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, मी एक एकर क्षेत्रात इंद्रायणी भाताची लागण केली आहे. पीक आता जोमात आहे. मात्र, करपा आणि तांबेरा रोगाची भीती आहे. बाजारातील महागडी ओषधे सामान्य शेतकऱ्यांना घेणे परवडत नाही. कृषी विभागाने त्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ओषधे देण्याची व्यवस्था करावी. बाकी इतर पिकास 50 टक्केच उत्पन्न अपेक्षित आहे. अतिपावसाने उत्पादन घटणार आहे, असे ठोमसे येथील शेतकरी रमेश माने यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com