कऱ्हाड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ व्हाव्यात, तेथे काम करणाऱ्यांना संधी मिळून लोकशाही बळकट व्हावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ वकिलांच्या नेमणुका केल्या आहेत. तत्काळ निकाल होण्याच्या दृष्टीने ते भूमिका मांडतील. न्यायालयाने स्थगिती उठविल्यावर निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.