
कऱ्हाड : महाराष्ट्र केसरी संजय पाटील (रा. आटके) यांचा तब्बल १५ वर्षांपूर्वी खून झाला होता. त्याचा तपास कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या तपासाचे चुकीचे निष्कर्ष काढून त्यांना त्यात अटक झाली होती. ती अटक अवैध आहे, असा आदेश मुंबईच्या उच्च न्यायालयाने काल (सोमवार) दिले.