सातारकरांचे कोरोनाला निमंत्रण; पु्न्हा देताहेत लॉकडाउनला आमंत्रण

सातारकरांचे कोरोनाला निमंत्रण; पु्न्हा देताहेत लॉकडाउनला आमंत्रण

सातारा : अर्थकारणाचा गाडा सुरळीत राहण्यासाठी, नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली; परंतु शहरासह जिल्ह्यामध्ये सुरक्षित अंतराच्या नियमाचा
फज्जा उडालेला आहे. त्यावरून दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या पाहूनही नागरिकांना कसलेच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्चपासून देशासह जिल्ह्यामध्ये लॉकडाउन सुरू झाले. या वेळी नागरिकांना अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. अत्यावश्‍यक सेवे व्यतिरिक्त सर्व दुकानेही बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते, तसेच बाहेर पडलेल्या नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत होते. या आवाहनाचे पालन न करणारे दुकानदार व नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली गेली. स्वत: पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही रस्त्यावर उतरून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत होत्या. हे सर्व करण्यामागे कोरोनाशी मुकाबला करण्यात शारीरिक अंतर राखणे किती आवश्‍यक आहे हे दाखवून देण्यासाठीच सुरू होते; परंतु साताऱ्यातील नागरिकांच्या व दुकानदारांना त्याचे गांभीर्य अद्याप समजलेलेच दिसत नाही. 

तब्बल दोन महिने राज्याचा गाडा बंद असल्यामुळे अर्थचक्र पुरते थांबले होते. त्यामुळे दुकाने व व्यवसाय उघडणे अत्यावश्‍यक बनले होते. त्यामुळे चौथ्या लॉकडाउनमध्ये कंटेनमेंट क्षेत्र वगळता सर्व प्रकारची दुकाने व व्यवसाय सुरू करण्यास राज्य शासनाने
परवानगी दिली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही साताऱ्यामध्ये सवलती लागू केल्या. कोरोना संपला म्हणून या सवलती देण्यात आलेल्या नव्हत्या, तर अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शारीरिक अंतर राखून, काळजी घेत
सर्व काही करायचे असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते; परंतु सगळे काही सुरळीत चालू झाले, अशा थाटात आता शहरासह जिल्ह्यामध्ये नागरिक बाहेर पडू लागले आहेत.

कोणत्याही ठिकाणी सहा फुटांच्या सुरक्षित अंतराचे पालन होताना दिसत नाही.
ठिकठिकाणी रस्त्यावर मंडई पुन्हा भरू लागल्या आहेत. त्या ठिकाणीही एकमेकाला खेटून नागरिक खरेदी करताना दिसून येत आहेत. दुकानदारांकडून त्यांना अडविले किंवा शारीरिक अंतर राखण्यासाठीची यंत्रणा उभारलेली दिसत नाही. नागरिक व दुकानदारांनी शारीरिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडवलेला आहेच; परंतु पोलिसांकडूनही याची दखल घेतली जात आहे, असे दिसत नाही. 

दुकानाबाहेरची गर्दी हटविण्यासाठी पूर्वी जो जोश पोलिसांकडून दिसत होता. आता तो अजिबात राहिलेला नाही. किंबहुना कोणाला टोकताना पोलिस दिसत नाही. त्यामुळे नागरिक व दुकानदारांनाही सारे काही आलबेल चालले आहे असते वाटत आहे; परंतु हे
जिल्ह्याच्या सामाजिक स्वाथ्यासाठी धोक्‍याचे आहे. कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात ग्रामीण, शहरी भागात नागरिक एकमेकांत मिसळत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे शारीरिक अंतर पाळण्याबाबत प्रशासनाने पुन्हा ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com