कोविड स्मशानभूमीमुळे पिण्याचे पाणी दूषित, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर

Satara
Satara

कोळकी (जि. सातारा) : गावातून वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्याशेजारी असलेल्या स्मशानभूमीत होत असलेल्या कोरोनाबाधितांवरील अंत्यसंस्कार व अस्थी, रक्षा विसर्जनामुळे कालव्यातील पिण्याचे पाणी दूषित होत असून, कालव्याशेजारी असलेल्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

येथील रावरामोशी पुलाजवळ कोळकी गावासाठी बांधलेल्या स्मशानभूमीत सध्या फलटण, माण व खटाव तालुक्‍यांमधील कोरोनाबाधित मृतांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. अंत्यविधीनंतर अस्थी, रक्षा विसर्जन शेजारी वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात सर्रास केले जाते. स्मशानभूमीत दररोज पाच ते दहा अंत्यविधी होत आहेत. हा कालवा श्री क्षेत्र पंढरपूरच्या पुढे वाहत जात आहे.

अनेक गावांनी आपले जलशुध्दीकरण प्रकल्प या कालव्याशेजारी उभे केलेले आहेत. फलटण तालुक्‍यातील जाधववाडी, कोळकी, फलटण, विडणीसह अनेक गावांचे जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच आहेत. रावरामोशी पुलाच्या पुढेच विडणीचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. सध्या प्रत्येक गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

विडणीमध्येही हा आकडा साठच्या पुढे गेला आहे. कालव्यामधील दूषित पाण्यामुळे विडणी ग्रामस्थांचेसुध्दा आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत विडणी ग्रामपंचायतीने तहसीलदार पाटील व फलटण पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना निवेदन देवून याबाबत तोडगा काढून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळावे, अशी मागणी केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com