
मोरगिरी (जि. सातारा) : स्वच्छ गाव व सुंदर गाव करण्यासाठी म्हणून खेडोपाडी "एक कदम स्वच्छता की ओर' म्हणत सुरू केलेले स्वच्छता अभियान निव्वळ फार्स ठरू लागले आहे. सभोवताली कचऱ्याचे साम्राज्य, तर सांडपाण्यांनी तुंबलेली गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले असून ग्रामविकासाचा पाया ढासळताना दिसत आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविणे सुरू केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली. पाटण, नवा रस्ता, मल्हारपेठ या ठिकाणी असलेल्या बाजारपेठा सोडल्या, तर खेडेगावांमध्ये कचरा उचलण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. बाजारपेठेमध्ये अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. मात्र, ते उचलले जात नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृहे तर मद्यपींचा अड्डा बनली आहेत. काही स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शहरी भागात केवळ सरकारी उपक्रम म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे, तर ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.