
कऱ्हाड (जि. सातारा) : खासगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्यासाठी समाज रस्त्यावर उतरून तो डाव उधळून लावेल, असा इशारा ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज येथे दिला. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले व अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न देऊन सन्मान करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
ओबीसी आरक्षणासंदर्भातील मागणीसाठीच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. माळी म्हणाले,"" खासगीकरणामुळे आरक्षण हे पूर्णपणे संपणार आहे. ओबीसी, भटके यांसह अन्य समाजातील लोकांचे आरक्षण संपणार आहे. आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे.
हे जर थांबले नाही तर या देशातील बीसी, ओबीसी, भटके हे सर्व लोक आक्रोश करून केंद्र सरकारचा हा मुद्दा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव संघटना उधळून लावेल.'' महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे या महापुरुषांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे. अनेक वर्षांपासून त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा प्रलंबित असून, लवकरत लवकर या महान व्यक्तींना भारतरत्न द्यावे, अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.