सातारा : बाह्यरुग्ण विभागाचा बोजवारा

जिल्हा शासकीय रुग्णालयात ओपीडीकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष; रुग्णांसह नातेवाईकांचे हाल
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातीलsakal

सातारा: येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील कारभाराचा पुन्हा बोजवारा उडत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयातील ओपीडीच्या वेळा माहीत नाहीत काय, अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दूरदूरच्या नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी वेळेबाबतचा क्लास घेणे आवश्यक आहे.

खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग असो वा आंतररुग्ण या ठिकाणी उपचाराचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. दररोज हजारापेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी विविध आजारांच्या उपचारासाठी येत असतात. बाह्यरुग्ण विभागाची हीच निकड व नागरिकांना होणारा फायदा लक्षात घेऊन शासनाने केवळ सकाळी असणारी ओपीडी सायंकाळीही सुरू केली. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकाळात काही अपवाद वगळता बाह्यरुग्ण विभागाचे काम अत्यंत सुरळीत राहील, याकडे लक्ष दिले होते. त्यानंतर डॉ. श्रीकांत भोई यांच्या काळात शिस्त बिघडली. डॉ. अमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारल्यावर काही प्रमाणात बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न केले. परंतु, कालांतराने त्यात पुन्हा बिघाड झाला. त्यातच कोरोना संसर्गामध्ये सर्वांचे लक्ष हे कोरोना रुग्णांच्या बाह्य व आंतररुग्ण विभागातील उपचारांकडेच राहिले. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागाकडे दुर्लक्ष झाले. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रुग्णांची संख्याही कमी झाली होती. त्यामुळे या अनियमिततेचा प्रभाव जास्त जाणवला नाही. परंतु, आता रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. बाह्यरुग्ण विभागात हजारो रुग्ण येत आहेत.

आओ जावो घर तुम्हारा...

सायंकाळच्या ओपीडीबाबत तर, न बोललेलेच बरे. कोण येते कोण नाही, याची व्यवस्थापनातील कोणाला माहिती असते का, हाच खरा प्रश्‍न आहे. त्याची तसदीही कोणी घेताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णालय म्हणजे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी तऱ्हा झाली आहे. चारच्या ओपीडीला साडेचार ते पाऊणेपाचपर्यंतही वैद्यकीय

अधिकारी हजर नसतात. सहाला ओपीडी संपते. परंतु, साडेपाचलाच सर्व ओपीडी मोकळ्या झालेल्या असतात. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची परवड होते आहे. वेळ पाळण्याच्या शिस्तीचा क्लास जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेणे आवश्यक आहे. केसपेपर काढण्यापासूनच

रुग्णांची परवड सुरू

सकाळच्या ओपीडीवेळी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. केसपेपर काढण्यापासून त्यांचे हाल सुरू होतात. गर्दी जास्त होत असल्याने अर्धा ते एक तास केसपेपर मिळविण्याच्या धडपडीतच रुग्णाला घालावा लागत आहे. रुग्णांची परवड इथेच थांबत नाही. त्यानंतर ओपीडी कक्षात डॉक्‍टरच्या शोधासाठी त्यांना ताटकळावे लागते आहे. अपवाद वगळता कोणताही वैद्यकीय अधिकारी नऊ वाजता आपल्या कक्षात हजर नसतो. अनेक महाशय दहानंतर कक्षात हजेरी लावतात. चार-दोन रुग्ण पाहिले की पडले बाहेर. त्यानंतर शिकाऊ डॉक्‍टरांकडेच ओपीडीचा ताबा. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान होईल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com