सातारा : सैनिकांना मिळणार पर्यावरणपूरक राखी

विविध बियांपासून राख्यांची निर्मिती; दुदुस्करवाडीत विद्यार्थी, पालकांसाठी कार्यशाळा
satara
satarasakal

सायगाव : दुदुस्करवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी बियांपासून पर्यावरणपूरक राखी तयार करण्याची कार्यशाळा जयहिंद फाउंडेशन व मुख्याध्यापक उमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत विविध बियांच्या राख्या तयार केल्या.सैनिकांसाठी काम करणाऱ्या जयहिंद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देशाच्या सीमेवरील सैनिकांना भाऊ व बहीण या प्रेमळ नात्याचा बंध असणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राख्या पाठवल्या जातात. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरण टिकावे, त्यापासून होणारे फायदे युवा पिढीला कळावेत, यासाठी पर्यावरणपूरक राखी बनविण्यासाठी विविध प्रकारच्या बिया गोळा केल्या.

राखीचा वापर झाल्यानंतर त्या बियांचे रोपण करून पर्यावरण राखण्याचा संदेश दिला गेला. या राख्या बनविण्यासाठी वापरल्या गेलेल्या बियांचे अंकुरणे, रोपण, फुलणे, त्याला फळ येणे हे नाते बहरल्यासारखे आहे. म्हणूनच नात्यातला प्रेमाचा बंध निसर्गासोबत जोपासला जावा, यासाठी केलेल्या या उपक्रमास ग्रामस्थ व महिलांनीही प्रतिसाद दिला.पान ४ वर

जयहिंद फाउंडेशनने राबविलेले सर्व उपक्रम प्रेरणादायी असतात. अशा प्रकारे देशाच्या सैनिकांसाठी बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या प्रत्येक गावागावांत तयार होऊन त्याचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखता येईल. ‘जयहिंदच्या’वतीने सैनिकांसाठी राबविलेल्या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने देशसेवा समजून सहभागी व्हावे.

- संदीप माने,अध्यक्ष, जयहिंद फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com