

Rose farmers in Satara
sakal
कऱ्हाड : वातावरणातील सततचे बदल आणि संततधार पावसामुळे गुलाबाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांची वाढ खुंटणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि फुलांची गुणवत्ता घसरणे या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. परिणामी बाजारात गुलाबाच्या फुलांचा पुरवठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.