"ह्यांचा' बंदोबस्त करणार तरी कधी?

patan
patan

तळमावले (जि. सातारा) : कुंभारगाव (ता. पाटण) गेल्या काही दिवसांपासून कुंभारगाव परिसरात वानरांनी धुमाकूळ घातला आहे. ही वानरे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वानरांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

समृद्ध वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्‍यात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून परिसरात रानडुकरे, रानगवे, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात वानरांनी धुमाकूळ घातला आहे. 

ही वानरे कुंभारगाव, मान्याचीवाडी, बोरगेवाडी, चाळकेवाडी, जांभूळवाडी, चिखलेवाडी, मोरेवाडी, शेंडेवाडी आणि गलमेवाडी या परिसरातील शेतीमधील खास करून भुईमूग पिकाचे नुकसान करीत आहेत. मात्र, या वानरांची तक्रार वन विभागाकडे करायची, की ग्रामपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. वानरांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने काही तरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वन खात्याने एक तर वानर पकडण्याची मोहीम राबवावी किंवा वानरांना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी विभागातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com