

Shambhuraj Desai
sakal
सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपने सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने प्रक्रिया राबवली होती. आज सभापती निवडीवर आमच्या सदस्यांनी बहिष्कार टाकून काळ्या फिती लावून सभागृहात हजेरी लावली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यादांच लोकशाहीची पायमल्ली झाली आहे. केवळ सभापती निवडी झाल्या म्हणजे जिल्हा परिषदेचा कालावधी संपला, असे होत नाही. इतक्यात शेवट होत नसतो. आगे आगे देखो होता है क्या, असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.