सातारा : ‘शिवभोजन’चा ६० हजारांना घास

जिल्ह्यात २८ केंद्र; किंमत वाढूनही लोकांचा चांगला प्रतिसाद
shiv bhojan thali
shiv bhojan thaliesakal

सातारा : कष्टकरी, मजूर व गरजू लोकांना राज्य सरकारची शिवभोजन थाळी आधार ठरत आहे. कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळीचे मोफत वितरित केली होती. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर थाळीची किंमत दहा रुपये करण्यात आली. थाळीची किंमत वाढूनही जिल्ह्यात सध्या २८ केंद्रांच्या माध्यमातून महिन्याला ५९ हजार ७०० थाळींचे वाटप केले जात आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीच्या माध्यमातून भुकेलेल्या गरीब- गरजू लोकांची भूक भागविण्याचे काम होत आहे.

राज्यभरात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गरीब- गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली. शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीला दहा रुपयांत शिवभोजन थाळी दिली जात होती. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मार्च २०२० नंतर दोन महिने सर्वच केंद्रे बंद होती.

दररोज १,९९० थाळींचा लाभ

जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत दोन लाख ३५ हजार १५९ शिवभोजन थाळींचा नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये महिन्याला सुमारे एक हजार ९९० थाळींचे वितरण झाल्याचे आकडेवारीवरून पाहायला मिळते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर थाळीची किंमत दहा रुपये करूनही शिवभोजनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

शिवभोजन थाळींच्या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रांवर नागरिकांना चांगल्या प्रतीचे जेवण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी, मजूर व गरजू लोकांना या योजनेचा फायदा होत आहे, तसेच कोरोना काळानंतरही केंद्रावर लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे.

- स्नेहा किसवे-देवकाते, उपजिल्हाधिकारी, सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com