

-निहाल मणेर
औंध : गेल्या २० वर्षांपासून नियमित धावणारी सातारा ते कान्हरवाडी एसटी बसच्या फेऱ्या १५ दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.