शिष्यवृत्ती परीक्षेत 952 विद्यार्थ्यांचे यश; कऱ्हाडसह सातारा तालुका अव्वल

शिष्यवृत्ती परीक्षेत 952 विद्यार्थ्यांचे यश; कऱ्हाडसह सातारा तालुका अव्वल

सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्यातून पाचवीचे आठ हजार 243 विद्यार्थी, तर आठवीचे तीन हजार 689 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील पाचवीच्या 474, तर आठवीच्या 478 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
 
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल ऑक्‍टोबर महिन्यात जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून पाचवीचे 21 हजार 175 विद्यार्थी बसले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचा 38.93 टक्के निकाल लागला आहे, तर आठवीचे 15 हजार 203 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांचा 24.26 टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत पाचवीचे 38 विद्यार्थी, तर आठवीचे 39 विद्यार्थी राज्य शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

Diwali Festival 2020 दीपोत्सवाने उजळला दुर्गेश्वर सज्जनगड; शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नगरी!

याचबरोबर जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुक्‍यात सर्वात जास्त 84 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे, तर आठवीसाठी सातारा तालुक्‍यात सर्वात जास्त 98 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर आसन क्रमांक टाकून पाहता येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com