सातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास "स्वाभिमानी' ने मारले जोडे

सातारा : सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास "स्वाभिमानी' ने मारले जोडे

सातारा : कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेले (ता. सातारा) येथे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
 
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
महाबळेश्‍वर ट्रेकर्सची भूतदया; 80 फूट विहिरीतून कुत्र्याला जीवदान

श्री. शेळके म्हणाले, ""केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली. ही विधेयके शेतकरीविरोधी असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी केंद्राच्या विरोधात दिल्लीत मोर्चा काढला आहे. या मोर्चात लाखो शेतकऱ्यांनी सहभागी होत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने बळाचा वापर करत हे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारच्या या प्रवृत्तीच्या निषेधार्थ साताऱ्यात केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.''

बा. सी. मर्ढेकर स्मारक लोकार्पणाचा अधिकार हवाय ग्रामस्थांना

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com