शिक्षकांना 12 नको, आठ तास हवी ड्युटी, चेकपोस्टवर बिघडते आरोग्य

Satara
Satara

उंडाळे (जि. सातारा)  : कोरोना प्रतिबंधात्मक संसर्गजन्य प्रभाव व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर बाहेरील राज्य व परजिल्ह्यातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आली असून, या चेकपोस्टवर नियुक्त करण्यात आलेल्या तंत्रस्नेही माध्यमिक शिक्षकांना सलग 12 तास ड्युटी लावण्यात आल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांची ड्युटी 12 तासांऐवजी आठ तास करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेसह जिल्हा व तालुका संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

शिक्षक भारती संघटनेचे उपाध्यक्ष नेमिनाथ बिरनाळे आणि सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, कऱ्हाड तालुका शिक्षक संघ यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आमचा माध्यमिक शिक्षक कधीही मागे हटत नाही, पण जिल्हा सरहद्दीवर लावण्यात येणाऱ्या ड्युटीबाबत मात्र आमची हरकत असून, याठिकाणी शिक्षकांना सलग 12 तास ड्युटी दिली जात आहे. त्यामध्ये रात्रपाळीतही ड्युटी देण्यात आली आहे. वास्तविक शैक्षणिक काम आठ तास चालते, तेही दिवसभरात अशा वेळी शिक्षकांना आठ तास किंवा त्याहून कमी तास ड्युटी द्यावी. कारण इतर ग्रामीण चेकपोस्टवर शिक्षकांना सहा ते साडेसहा तास ड्युटी असून, जिल्हा सरहद्दीवरील चेकपोस्टवर मात्र 12 तास ड्युटी का, असा सवाल करून ही ड्युटी कमी करावी. तसेच कोणत्याही शिक्षकाला ड्युटी देताना ती त्या केंद्रात द्यावी, अशी मागणी 
केली आहे. 

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण दहा चेकपोस्ट असून, या चेकपोस्टवर 40 शिक्षकांना दिवस आणि रात्रपाळीत काम दिले जाते. त्यामुळे या शिक्षकांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून 30 ते 40 किलोमीटर अंतर प्रवास करावा लागतो. या प्रवास काळात प्रवास करताना शिक्षकांचा अपघात होण्याची भीती असून, शिक्षकाच्या आरोग्यावर सलग 12 तास ड्युटी व प्रवास यामुळे ताण येत आहे. माध्यमिक शिक्षक ड्युटी करण्यास समर्थ आहे. इतरांना ज्याप्रमाणे ड्युटी देण्यात येत आहे, त्याच पद्धतीने केंद्र परिसरात आठ तास ड्युटी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती वरिष्ठांनाही देण्यात आल्या आहेत. 


""शिक्षकांना सलग 12 तास ड्युटी लावण्यात आल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांची ड्युटी वेळ 12 तासांऐवजी आठ तास करावी, याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी आपले बोलणे झाले असून, याबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.'' 

-नेमिनाथ बिरनाळे, उपाध्यक्ष, राज्य शिक्षक भारती 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com