कऱ्हाड शहराला प्रदूषणाचा विळखा; ठोस उपाययोजनांची गरज

शहरात वर्षात ४० टक्क्यांनी वाढ; प्रदूषणमापक यंत्राचा धक्कादायक अहवाल
Pollution
PollutionSakal media
Summary

शहरात वर्षात ४० टक्क्यांनी वाढ; प्रदूषणमापक यंत्राचा धक्कादायक अहवाल

कऱ्हाड : शहरातील प्रदूषण नियंत्रणाची पातळी चांगली असल्याचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. मागील वर्षी प्रदूषण नियंत्रणाची स्थिती आटोक्यात असताना अवघ्या वर्षभरात शहरातील प्रदूषण ४० टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षी प्रदूषणाची पातळी ४० टक्के होती, ती यंदा ६० टक्क्यांकडे गेली आहे. कोरोनाच्या काळात जवळपास शून्य टक्के प्रदूषणाची पातळी होती. मात्र, अनलॉकच्या काळात प्रदूषण तब्बल ६० टक्क्यांपर्यंत गेल्याचा धक्कादायक अहवाल मिळाला आहे. पालिकेने (karad nagarparishad)लावलेल्या हवा, प्रदूषण मापक यंत्रणेने दिलेल्या आकडेवारीवरून हे समोर येत आहे. शहरात वाहनांचा वाढलेला वापर कऱ्हाडला प्रदूषणाचा(pollution) विळख्यात ढकलू लागला आहे.

Pollution
शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चांगलाच पेटलाय; पाहा व्हिडिओ

शहरातील पाच वेगवेगळ्या चौकांमध्ये पालिकेने प्रदूषण तपासणी यंत्रे बसवलेली आहेत. त्याव्दारे झालेल्या अभ्यासाचा अहवाल मिळाला आहे. त्यात प्रदूषणाची सरासरी पातळी २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे प्रदूषण धोक्याची रेषा ओलांडण्यापूर्वीच उपाययोजनांची गरज आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत दत्त चौक, कृष्णा नाका, विजय दिवस, चावडी चौक, पोपटभाई पेट्रोल पंप आदी चौकांत हवा प्रदूषण मापक यंत्र व ॲम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग यंत्रे बसवली आहेत. त्याव्दारे शहरातील वाहनांची संख्या, वायू प्रदूषण, त्याचा श्वसनावरील परिणामांसह हवेतील धूलिकणासहित सल्फर ऑक्सिड, नायट्रोजन ऑक्सिड, नाकावाटे जाणाऱ्या धूलिकणांचा आणि तरंगणाऱ्या धूलिकणांचे मोजमाप केले जाते.

Pollution
POLITICAL NEWS | आमदार,खासदारांना कोर्टाचा चांगलाच दणका, नेत्यांनो! ही बातमी चुकवू नका;पाहा व्हिडिओ

मागील वर्षी २०२० मध्ये पहिला अहवाल आला. त्यात शहरातील प्रदूषणाची सरासरी पातळी २० टक्के होती. वर्षभरात त्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ च्या अहवालात प्रदूषणाची पातळी(pollution level ) ६० टक्के झाल्याची नोंद आहे. हवेतील धुलिकणातून सर्वाधिक प्रदूषण होताना दिसते आहे. श्वसनातून शरीरात जाणाऱ्या धुलिकणाचे प्रदूषण जास्त आहे. शहरातील विजय दिवस चौक येथे सर्वाधिक धोकादायक प्रदूषण आहे. चावडी चौकात तीच पातळी सर्वांत कमी आहे.

...अशा उपायांची गरज

  1. सिग्नल लागल्यानंतर सुरू असलेली वाहने बंद करावीत

  2. धुलीकण कमी करण्यासाठी प्रत्येक चौकात कारंजाव्दारे तुषार सोडणे

  3. वाहतुकीचे नियम पाळावेत

  4. नागरिकांनी त्यांच्या वाहनांची योग्य देखभाल-दुरुस्ती करावी

  5. नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत जागृती करणे( pollution Awareness)

  6. पीयुसी तपासणीचे सर्टीफिकेट बंधनकारक करणे(PUC certificate)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com