जावळीच्या घनगर्द हिरवाईत विसावलेल्या, अनवट वाटेवर असलेल्या अन् रम्य निसर्गाचा सहवास लाभलेल्या या स्वयंभू शिवमंदिरांविषयीची भाविकांना भुरळ आजही कायम आहे.
सातारा : सह्याद्रीच्या कुशीत स्थापित असलेली सप्तशिवालये म्हणजे जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव. पौराणिक अन् ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या या सप्तशिवालयांचे धार्मिक महत्त्व काळाच्या बदलत्या प्रवाहात आजदेखील अबाधित आहे. जावळीच्या घनगर्द हिरवाईत विसावलेल्या, अनवट वाटेवर असलेल्या अन् रम्य निसर्गाचा सहवास लाभलेल्या या स्वयंभू शिवमंदिरांविषयीची भाविकांना भुरळ आजही कायम आहे.