

Tripti Veer bravery saves life on Krishna river bridge
esakal
कऱ्हाड : भर पावसात कृष्णा नदीवरील पुलावर आत्महत्येच्या तयारीत असलेल्या एकास धाडस, प्रसंगावधान आणि माणुसकीच्या बळावर मृत्यूच्या दारातून परत आणण्याची थरारक कामगिरी शहर वाहतूक शाखेच्या महिला हवालदार तृप्ती वीर यांनी केली. क्षणाचाही विलंब न लावता दाखविलेल्या धाडसामुळे एका कुटुंबाचा आधार वाचला. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.