

What the Kaspersky 2025 Report Reveals about Indian Cyber security
esakal
डिजिटल युगात इंटरनेट डिस्कनेक्ट केल्याने आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील असा गैरसमज बाळगणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतातील संगणक वापरकर्त्यांपैकी जवळपास प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला इंटरनेटशी जोडले नसतानाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. एकूण ६.४६ कोटींहून अधिक असे ऑफलाइन हल्ले रोखण्यात आले आहेत. यामुळे भारत जगातील ८० सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.