भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने शनिवारी जाहीर केले की त्यांनी वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निसच्या 9,925 युनिट्स परत मागवल्या आहेत.3 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आलेल्या अशा कार कंपनीने परत मागवल्या आहेत.
याच्या कारणाबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, या गाड्यांच्या मागील ब्रेक असेंबली पिनमध्ये दोष आढळून आला आहे. मारुती सुझुकीने सांगितले की, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून वाहन परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारचे सदोष भाग मोफत बदलले जातील असेही कंपनीने म्हटले आहे.
मारुती सुझुकी काय म्हणाली?
मारुती सुझुकीने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की आम्हाला शंका आहे की मागील ब्रेक असेंबली पिन (पार्ट) मध्ये दोष आहे, ज्यामुळे प्रवास करताना खूप आवाज येतो. या खराबीमुळे दीर्घ कालावधीत ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने सदोष भागांच्या चाचणीसाठी वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
रिप्लेसमेंटची व्यवस्थाही केली जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मारुती सुझुकी ज्यांच्या कारमध्ये बिघाड स्वतः आपल्या ग्राहकांशी संपर्क साधणार आहे. मारुती सुझुकीने शुक्रवारी सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीसाठी स्टॅंडअलोन नेट प्रॉफिट जाहीर केला, जे दर्शविते की कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा चार पटीने वाढून 2,062 कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल जवळपास 46 टक्क्यांनी वाढून 29,931 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर या तिमाहीत एकूण विक्रीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढून 517,395 युनिट्सवर पोहोचले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.