

esakal
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र आज केवळ प्रगतीपथावर नसून जागतिक स्तरावर एक 'सुपरपावर' म्हणून उदयास येत आहे. विज्ञान दिन २०२६ च्या निमित्ताने भारताच्या या वाटचालीकडे पाहताना अभिमान वाटतो. एकेकाळी आपण पाश्चिमात्य देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून होतो पण आज भारत अंतराळ तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जगाचे नेतृत्व करत आहे. "विकसित भारत @2047" या संकल्पनेला बळ देण्यासाठी आजचे भारतीय शास्त्रज्ञ रात्रंदिवस नवनवीन प्रयोग करत आहेत ज्यामुळे सामान्य माणसाचे जीवन जास्त सोपे होत आहे.