

TRAI proposes new digital complaint redressal rules for Jio, Airtel, and Vi
esakal
मोबाईल नेटवर्क, इंटरनेट स्पीड किंवा बिलिंगच्या समस्या सोडवताना ग्राहकांना होणारा त्रास लवकरच कमी होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांसाठी तक्रार निवारण प्रणाली पूर्णपणे बदलण्याचा मोठा प्रस्ताव जाहीर केला आहे. जिओ, एअरटेल आणिvi सारख्या कंपन्यांना आता ग्राहकांच्या तक्रारी अधिक वेगाने आणि सोप्या पद्धतीने सोडवाव्या लागतील.