

Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
sakal
पावसाळ्यात धबधबे, घाटरस्ते, किल्ले, दऱ्या आणि निसर्गरम्य स्थांकडे पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओढा वाढत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या नव्या ठिकाणांनाही अनेक पर्यटक भेट देत आहेत. मात्र या ठिकाणांची पुरेशी माहिती नसल्याने तसेच सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अनेकदा अपघात, पूरस्थिती, वाट चुकणे किंवा अन्य अघटित घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी गटाने जाण्यापूर्वी पर्यटन विभागाला पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहन पर्यटन विभागाने केले.