

Monsoon Travel Safety Tips
sakal
Monsoon Travel: मॉन्सूनच्या आगमनामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवाईचा शालू पांघरून नटत आहेत. सर्वत्र धबधबे, ओढे आणि नाले वाहू लागण्यास सुरुवात झाली आहे. नयनरम्य निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी सध्या पर्यटक आणि ट्रेकर्सची पावले सह्याद्रीकडे वळत आहेत. मात्र, या पावसाळी भटकंतीत निसर्गाचा आनंद घेताना साहसासोबतच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन 'अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा'ने (एएमजीएम) केले आहे.