

संदीप वरकड, गंगापूर
लाखो वारकरी ऊन-पावसाची पर्वा न करता भजनात तल्लीन होऊन मजल दर मजल करीत पंढरपूरनगरीच्या दिशेने लवकरच मार्गक्रमण करणार आहेत.
मे महिन्याअखेर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध देशातील लोकांना वेध लागतात ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या वारी सोहळ्याचे. राज्यातील मठामठात आषाढी वारीची लगबग सुरू होते. कोणत्या दिवशी मुक्काम कोठे असेल, भोजनाची व्यवस्था कशी असणार याचे नियोजन महाराज करतात.