

India's Most Beautiful Lake Palaces
esakal
Water Marvels: भारतातील भव्य आणि ऐतिहासिक राजवाडे म्हटले की, आपल्याला उंच टेकड्या, वाळवंट किंवा मोठे किल्ले आठवतात. पण तुम्हाला माहीत आहे का ? आपल्या देशात काही असेही राजवाडे आहेत जे चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले आहेत ! राजा-महाराजांनी उन्हाळ्यातील विश्रांतीसाठी किंवा मनोरंजनासाठी बांधलेले हे 'वॉटर पॅलेस' भारतीय इंजिनिअरिंग आणि सौंदर्याचा अद्भूत नमुना आहेत.
जयपूरच्या 'मान सागर' तलावाच्या मध्यभागी असलेला जलमहाल हा राजस्थानातील एक प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. १८ व्या शतकात महाराजा माधोसिंह (पहिले) यांनी हा राजवाडा शिकारीची जागा आणि विश्रांतीसाठी बांधला होता.
खास वैशिष्ट्य: जेव्हा हा तलाव पूर्ण भरतो, तेव्हा या ५ मजली इमारतीचे तब्बल ४ मजले पाण्याखाली जातात ! त्यामुळे हा वाडा पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. सध्या पर्यटकांना आत जाण्यास बंदी असली, तरी तलावाच्या किनाऱ्यावरून दिसणारे याचे दृश्य मनाला भुरळ पाडते.