'पवारांवर टिका म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखेच'...भुजबळांचा पडळकरांना टोला 

bhujbal meeting.jpg
bhujbal meeting.jpg

नाशिक : "मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातीतल सर्वच व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तो मागे घेता येणार नाही. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याने ही गरज ओळखून दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यवसाय बंद करण्यासाठी कोणी दबाव आणू नये, तक्रार आल्यास हयगय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. 26) दिला.

सम-विषम फॉर्म्युला योग्य

शासकीय विश्रामगृह व्यापाऱ्यांची बैठक पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आदी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या वतीने सम-विषम तारखांऐवजी नियमित दोन्ही बाजुकडील दुकाने सुरु ठेवून वेळ सकाळी 10 ते 5 करण्याची मागणी केल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. पुणे शहरात अशा प्रकारचा प्रयोग झाला मात्र बाजारात गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शासनाचा सम-विषम फॉर्म्युला योग्य असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ज्या व्यापाऱ्यांना वेळेत बदल हवा असेल तर वैयक्तिक पातळीवर निर्णय घेऊ शकतात. मात्र दुकाने बंद करण्यासाठी दबाव सहन केला जाणार नाही. 

एकट्या नाशिकसाठी वेगळा निर्णय घेता येणार

जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकाने बंद करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय संपुर्ण राज्यासाठी असल्याने एकट्या नाशिकसाठी वेगळा निर्णय घेता येणार नाही. तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळेचं व्यवहार सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या पोटापाण्याचाही प्रश्‍न सोडविण्यासाठी हा निर्णय असून एका भागात बंद करण्यात आला म्हणून दुसऱ्या भागात बंद करण्याची चढाओढ सहन केली जाणार नाही. नागरिकांनी देखील बाजारात अनावशक्‍य गर्दी टाळण्याचे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. 

खासगी रुग्णालयांत डॅश बोर्ड 

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक नाशिक मध्ये आले त्याचा परिणाम कोरोना रुग्ण संख्या वाढण्यात होताना दिसतं आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात खासगी रुग्णालयांच्या दर्शनी भागावर डॅश बोर्ड लावला जाणार असून त्यातून रुग्णालयात शिल्लक असलेल्या जागेबाबत स्पष्टीकरण मिळेल अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 

मग देश बंद करा 

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहर दहा दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या आमदारांनी केल्याने त्याला उत्तर देताना श्री. भुजबळ यांनी लॉकडाऊन हवा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपुर्ण देश बंद करायला सांगा असा सल्ला त्यांनी दिला. 

पवारांवरील टिका सुर्यावर थुंकण्यासारखे 

शरद पवार यांचे कार्य संपुर्ण देशाला माहित आहे. कोरोना व चक्रीवादळाच्या संकट काळातही तरुणांना लाजवेल असे काम ते करतं आहे. परंतू बिनकुवतीची माणसे त्यांच्यावर टिका करतात ती प्रसिध्दीसाठी असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला. शरद पवार यांच्यावर बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कुवत ओळखून बोलावे असा सल्ला दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com